सोलापूर : उजनी धरणात बोट पलटी (Ujani Dam Boat Tragedy) होऊन झालेल्या अपघातामधील 6 जणांपैकी 5 जणांचे मृतदेह सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्या 5 जणांपैकी 4 जण एकाच कुटुंबातील आहेत. मृत व्यक्तींमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या 2 चिमुकल्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेमध्ये संपूर्ण कुटुंबालाच जलसमाधी मिळाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
उजनी धरण पात्रात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वारा सुटला होता. या वादळी वाऱ्यात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशी हून सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातल्या कुगावकडे ही बोट जात होती. वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे बोट उलटी झाली, या बोटीमधले 6 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती.
चाळीस तासांनंतर जवळपास एनडीआरएफने शोधकार्य थांबवलं आहे. सर्व मृतदेह सापडले असून ओळखही पटली आहे. सर्व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रहिवासी होते अशी माहिती मिळाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन
Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू