रायगड : रायगडमधून एक भीषण अपघाताची (Bus Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये रिक्षा आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुर्दैवाने 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई -गोवा महामार्गावरील माणगाव या ठिकाणी हा अपघात झाला. ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावला आली असताना हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कसा घडला अपघात?
मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीक शिवशाही बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगाव येथील मानस हॉटेल समोर आली असता रिक्षा आणि या बसमध्ये अपघात झाला. सकाळी साडआकरा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
दत्तात्रय वरणदेकर, प्रवीण मालसुरे व आणखी एक प्रवाशी अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. बसचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ashok Hinge Patil : चर्चेतील चेहरा : अशोक हिंगे पाटील
Heatstroke : उष्माघात म्हणजे काय? काय आहेत त्याची लक्षणे?
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा मिळणार? काँग्रेसची वंचितला सर्वात मोठी ऑफर
Junnar News : जुन्नरमधील आर्वी गावामध्ये आढळला बिबट्या; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Beed News : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा त्यांच्याच उपजिल्हाप्रमुखावर हल्ला
Nanded News : चिमुकली झाली पोरकी ! पतीच्या अपघाती मृत्यूनंतर पत्नीनेदेखील संपवलं आयुष्य
Pimpri Video : दारुच्या नशेत शर्ट काढून दहशत पसरवणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल
Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर
Delhi High Court : सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही; कोर्टाचा मोठा निर्णय