जळगाव : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे (Jalgaon News) प्रमाण वाढतच चालले आहे. चुकीच्या पद्धतीने गाडी चालवणे, तसेच नियमांचे पालन न केल्यामुळे हे अपघात होत असतात. अशीच एक अपघाताची घटना मुंबई- नागपूर महामार्गावर घडली आहे. यामध्ये एका खासगी ट्रॅ्व्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना एरंडोल तालुक्यातील पिंपळ -कोठा गावाच्या हद्दीत घडली आहे. ट्रॅव्हल्स दुभाजकावर आदळून हा अपघात झाला आहे.
काय घडले नेमके?
या अपघातामध्ये चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या मदतीनं एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये ट्रॅव्हल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
सुरू असलेल्या संततधार पावसामुळं चालकाला वळण रस्त्याच्या अंदाज न आल्यानं हा अपघात घडला. बस दुभाजकावर आदळून पलटी झाल्यामुळे हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक मदतीसाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्याला सुरुवात केली. या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून, इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.