तेलंगणा : तेलंगणातून (Telangana Crime News) एक हादरवणारी घटना समोर आली आहे. यामध्ये संपत्तीच्या वादातून एका तरुणाने एकाच कुटुंबातील 6 जणांचा जणांची निर्घृणपणे हत्या केली आहे. एका 20 वर्षीय तरुणाने एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. संपत्तीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक हादरले आहे.
काय आहे प्रकरण?
तेलंगणातील मकलूर येथे एका 20 वर्षीय तरुणाने जमीन हडप करण्यासाठी एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केली. मात्र, पोलिसांना केवळ चार अनोळखी मृतदेह शोधण्यात यश आले आहे. पोलिसांना प्राथमिक तपासात सर्व प्रकरणांमध्ये एका व्यक्तीचा सहभाग असल्याचे दिसून आलं आहे. या घटनेमुळे पोलिसांनाही जबर धक्का बसला आहे. मृतांमध्ये मकलूर गावातील रहिवासी मंगली प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, दोन मुले आणि दोन बहिणी यांचा समावेश आहे. हे कुटुंब मकलूर सोडून कामरेड्डी जिल्ह्यातील माचरेड्डी गावात स्थायिक झाले होते.
हे हत्याकांड आठवडाभर सुरू होते. 9 डिसेंबरपासून या हत्याकांडाला सुरुवात झाली होती. या हत्याकांडामध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. 14 डिसेंबर रोजी कामारेड्डी जिल्ह्यातील सदाशिव नगर पोलीस ठाण्याच्या परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. तो मृतदेह पूर्णपणे जळाला होता. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन संशयितांना अटक केली होती. त्यानंतर यानंतर मेडक जिल्ह्यात आणखी एका महिलेचा मृतदेहसुद्धा तशाच अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता दोन्ही महिला सख्ख्या बहिणी असल्याचे समोर आलं. यानंतर पोलिसांना निजामाबाद जिल्ह्यातून दोन मुलांचे मृतदेह सापडले. एका पुलाखाली मुलांचे मृतदेह पडले होते. त्यानंतर आणखी तपास केला असता पोलिसांना मृत लहान मुले आणि महिला या दोघांचाही संबंध असल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आल्यानंतर तेलंगणात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली असता दोन्ही मृत मुलांचे पालकसुद्धा बेपत्ता आहेत. त्यांच्या कामारेड्डी येथील घरालाही कुलूप आहे. त्याचाही खून झाला असावा, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मुलांच्या वडिलांनी त्यांची संपूर्ण मालमत्ता स्वतःच्या नावावर हस्तांतरित केली होती. त्यांनी मालमत्ता परत करण्यास नकार दिल्यामुळे घरात मोठ्या प्रमाणात वाद झाला होता.
जेव्हा प्रसाद कुटुंब माचरेड्डी येथे राहत होते, तेव्हा त्यांच्या मॅक्लुरे येथील घराची देखरेख मंगली प्रसादचा मित्र गोल्लू प्रशांत करत होता. मंगली प्रसादला त्याच्या मालमत्तेवर कर्ज घेण्यास अडचण येऊ लागल्याने त्याने ती गोल्लू प्रशांतच्या नावे हस्तांतरित केली होती. जेव्हा कर्जाची परतफेड करायची वेळ आली तेव्हा प्रसादने प्रशांतला मालमत्ता परत करण्यास सांगितले. मात्र प्रशांतने त्याला नकार दिला. त्यानंतर निजामाबाद-कामारेड्डी राष्ट्रीय महामार्गालगतच्या जंगल परिसरात प्रसादची हत्या झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारानंतर प्रसादच्या पत्नीची हत्या करण्यात आली. प्रशांतने तिला सांगितले होते की प्रसादला अटक करण्यात आली आहे. खोटं बोलून प्रशांतने प्रसादच्या पत्नीची हत्या केली आणि तिचा मृतदेह बसरा येथील नदीत टाकून दिला. त्यानंतर प्रशांतने प्रसादच्या मोठ्या बहीणींची आणि दोन मुलांची हत्या केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या हत्याकांडामुळे संपूर्ण तेलंगणा हादरलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident News : जळगावात कंटेनर आणि बोलेरोमध्ये धडक होऊन भीषण अपघात; 3 जण जागीच ठार
Aniket Pote : अल्टीमेट खो-खो सीझन 2 मध्ये मुंबई खिलाडी संघाच्या कर्णधारपदी अनिकेत पोटे याची निवड
Pune PMC Water Supply News : गुरूवारी अर्ध्या पुणे शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद
Salim Kutta : भाजप आमदार नितेश राणे यांनी आरोप केलेला सलीम कुत्ता नेमका आहे तरी कोण?