लातूर : दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात (Latur News) उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. यावरून राज्यातील (Latur News) वातावरण चांगलेच तापले आहे. यादरम्यान आता लातूर जिल्ह्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळत आहे. शिरुर ताजंब येथे अज्ञात व्यक्तीकडून बसवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीमध्ये बसची समोरची काच फुटली आहे.
काय घडले नेमके?
जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू होतं. मात्र उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर आंदोलक आक्रमक झाले आहेत. आजही या घटनेचे राज्यातील अनेक भागात पडसाद उमटत असल्याचं पहायला मिळत आहे. जालन्यात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे पडसाद नाशिक जिल्ह्यात उमटले आहेत.
या घटनेचा निषेध करण्यासाठी नाशिक ग्रामीणमध्ये बंद पाळण्यात आला आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी सटाण्यात मालेगाव -सुरत महामार्गावर रस्ता रोको केला. तसेच नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन देखील करण्यात आले. रस्ता रोको आंदोलनामुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.