सातारा : सातारा (Satara News) जिल्ह्यातील जावली तालुक्यामधील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कास परिसरातील (Satara News) एकिव धबधब्याच्या कड्यावरून पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. पाऊस व अंधारामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास पावसामुळे अडथळे येत होते. हे दोन तरुण सातारा तालुक्यातील बसप्पाचीवाडी व करंजे पेठ या ठिकाणचे आहेत. अक्षय आंबवले व गणेश फडतरे अशी त्या मृत तरुणांची नावे आहेत.
या घटनेची माहिती मिळताच (Satara News) मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. साताऱ्यातून शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम व महाबळेश्वर टेकर्सच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. रविवारी सुट्टी असल्याने जावळी तालुक्यातील एकीव धबधब्यावर 4 जण फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी ते मद्यधुंद अवस्थेत होते. या अवस्थेतच त्यांच्यात भांडण झाले. यादरम्यान अक्षय आणि गणेश यांचा तोल जाऊन ते 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळले.
रात्रीची वेळ, मुसळधार पाऊस व अवघड जागा असल्यामुळे घटनास्थळी मदत कार्य करण्यास व त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. रात्री उशिरा या दोघा युवकांपर्यंत पोहोचण्यास रेस्क्यू टीमला यश आले आहे. यावेळी एकीव धबधब्यावर तरुणांची नेहमीच हुल्लडबाजी होत असल्याने शनिवार व रविवार पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ व पर्यटक प्रेमींकडून केली जात आहे.