सातारा : आळंदी – पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर काल रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात (accident) झाला. आळंदी – पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर तांबमळा (फरांदवाडी) या ठिकाणी एका भरधाव टिप्परने दुचाकीस्वारांना जोरात धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि यामध्ये दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोघेही फलटणमधील (Phaltan) रहिवाशी होते. या अपघाताने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
बुलेट क्रं. एमएच 11 सीपी 4778 वरून अमिर ताजुद्दीन शेख (वय 32, रा. शुक्रवार पेठ फलटण) 9Ameer Tajuddin Sheikh) आणि गणेश सुनिल लोंढे (वय 35, रा. मंगळवार पेठ, फलटण) (Ganesh Sunil Londhe) हे मध्यरात्री 12 वाजता पुण्याहून फलटणकडे येत होते. यादरम्यान तांबमळा येथील गुरू हॉटेलच्या पुढील बाजूस टाटा कंपनीच्या दहाचाकी टिप्परने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की,यामध्ये बाइकवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अमिर शेख हा बिर्याणी हाऊस चालवत होता, तर गणेश लोंढे याचा चायनिजचा गाडा होता. दोघांचाही मित्रपरिवार मोठा होता. त्यामुळे या अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याचे समजताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. या प्रकरणाचा अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.