पुणे : शनिवारी वाघोलीतील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी एका आयटी इंजिनियरची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा अधिक तपास करत पोलिसांनी अवघ्या 24 तासात त्याच्या मारेकऱ्यांना अटक केली आहे. गौरव सुरेश उरावी (वय 35, शिवाजीनगर अमरावती) (Gaurav Suresh Uravi) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर टॅक्सी चालक भगवान केंद्रे (वय 23) (Bhagwan Kendre) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
वाघोलीतील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी शनिवारी दुपारी गौरवचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. तसेच घटनास्थळी त्याची दुचाकी सापडली होती. दुचाकीवरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली. शुक्रवारी रात्री गौरव जेवायला जातो सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो परत आलाच नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह आढळून आला.
यानंतर लोणीकंद पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपी भगवान केंद्रे याने गौरव चा खून केल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी आरोपीला परतापुर येथून ताब्यात घेतले. यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. गौरवने 3000 परत न दिल्याने आरोपीने आपल्या साथीदाराच्या मदतीने गौरवचा खून केला. लोणीकंद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.