पंढरपूर : पंढरपुरातून (Pandharpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात काल सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे करकंब गावावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.
गणेश नितीन मुरकुटे (वय 7 वर्ष), हर्षवर्धन नितीन मुरकुटे (वय 8 वर्ष) आणि मनोज अंकुश पवार (वय 11 वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत. ही तीन लहान मुलं खेळता खेळता शेततळ्यामध्ये उतरली. तळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. बाहेर गेलेली मुलं संध्याकाळ झाली तरी अजून कशी घरी परत आली नाहीत, म्हणून त्यांच्या आईवडिलांनी सगळीकडे शोध घेतला.
यादरम्यान घराच्या जवळच असलेल्या परदेशी या शेतकऱ्याच्या शेततळ्यात या तिघांचे मृतदेह आढळून आले. आपल्या मुलांचे मृतदेह बघून आईवडिलांनी हंबरडा फोडला. आईवडिलांचा आक्रोश बघून सगळ्यांच्या डोळ्यांत यावेळी पाणी आले. एकाच वेळी तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Palghar Accident : युटर्नचा अंदाज चुकला अन् घात झाला; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद
Dombivli Fire : डोंबिवली जवळील पलावा वसाहतीतील इमारतीला भीषण आग
Pune Fire: मार्केटयार्डमधील आंबेडकर नगर झोपडपट्टीला आग
Amravati News : स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी
Loksabha Election : ना राहुल गांधी ना शरद पवार इंडिया आघाडीच्या संयोजकपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती
Pune Lonavala Local : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकल पुन्हा होणार सुरु
IND vs ENG : इंग्लंडविरूद्ध टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ 22 वर्षीय खेळाडूला लागली लॉटरी
Sharad Mohol : …तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; पोलीस चौकशीत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर
Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावतंला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक