पंढरपूर : आजकाल प्रत्येक गावागावात, घराघरात शेतीवरून वाद होताना आपण पाहत असतो. या शेतीपायी लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. अशीच एक धक्कादायक घटना पंढरपुरमधून (Pandharpur News) समोर आली आहे. यामध्ये शेतीच्या वादातून न्यायालयात सुरु असलेली केस काढून घेत नाही म्हणून शेतकऱ्यासोबत काही आरोपींनी धक्कादायक कृत्य केले आहे.
काय घडले नेमके?
ही धक्कादायक घटना माळाशिरस तालुक्यातील बाभूळगाव या ठिकाणी घडली आहे. यातील पीडित अरुण दळवी हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. विकी उर्फ आण्णा पराडे, गजेंद्र समाधान पराडे, रोशन पराडे, अमर माने, महेश गोडसे, अनिल मिटकल अशी आरोपींची नावे असून त्यांनी जातीय द्वेषातून हा हल्ला केल्याचे समजत आहे.
जखमी अरुण दळवी यांच्या पुतण्याचा आणि आरोपींचा 2020 साली शेतीवरून वाद झाला होता. हा वाद न्यायालयात गेला होता. ही केस काढून घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. हे आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी जखमी शेतकरी अरुण दळवी यांचे पाय तोडले. या प्रकरणी अकलूज पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या आरोपींपैकी 4 जणांना अटक करण्यात आली आहे तर 1 जण बेपत्ता आहे. त्याचा पोलिसांकडून कसून शोध सुरु आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident News : हिंगोलीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात
Ashutosh Gowariker : मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : आशुतोष गोवारीकर
Freedom of Information : माहिती अधिकार कट्ट्याचा 10 वा वर्धापन दिन साजरा