नाशिक : नाशिकमधून (Nashik Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चांदवडमधील राहुड घाटामध्ये एका एसटी बसचा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात 3 ते 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
कसा झाला अपघात?
मुंबई-आग्रा मार्गावर हा अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या या एसटी बसचा टायर अचानक फुटला. राहुड घाट परिसरामध्ये हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये मोठ्या संख्येनं प्रवासी होते. बसच्या पुढील बाजूला डावीकडील टायर फुटला आणि बस एका बाजूला झुकली. प्रवाशांना सावरण्यासाठीही वेळ मिळाला नाही. टायर फुटल्याने बसवरील ताबा सुटल्यानंतर अनेकजण बाहेर फेकले गेले किंवा बसल्या खिडक्यांवर आदळले. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 3 ते 4 प्रवासी दगावल्याची भिती व्यक्त केली जात आहे. अपघातामध्ये 17 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केलं आहे. या मार्गावरुन जाणाऱ्या इतर वाहनांमधील प्रवाशांनी थांबून अपघातग्रस्त एसटी बसमधील प्रवाशांना बाहेर काढलं. हा अपघात नेमका कसा घडला? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान