नाशिक : नाशिक (Nashik News) मुंबई मार्गावर इगतपुरीजवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बॅरिकेड्स तोडून दुचाकी थेट समोरील ट्रॅकवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. समाधान देवराम भगत, सचिन कचरू पथवे असे या अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे तर भाऊ भगत हे या अपघातात जखमी झाले आहेत.
काय घडले नेमके ?
समाधान भगत, सचिन पथवे आणि भाऊ भगत हे तिघेजण एकाच दुचाकीवरून ट्रिपल सीट जात होते. यादरम्यान इगतपुरीजवळ आल्यावर चालकाचे बाइकवरील नियंत्रण सुटले आणि ते थेट रस्त्यावरील बॅरिकेड्स तोडून समोरील ट्रकवर जाऊन आदळले. हा अपघात एवढा भीषण होता कि, यामध्ये बाईकचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीमच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी टोलच्या रुग्णवाहिकेद्वारे दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. इगतपुरी पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास सुरु आहे. इगतपुरीजवळ साई कुटीरजवळ हा भीषण अपघात झाला.