नांदेड : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु केले होते. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात पाहायला मिळाले. परंतु सरकारने दोन महिन्याचा अवधी मागून घेतल्याने आरक्षणाचा लढा काही अंशी थंडावला. मात्र तरुणांच्या मनात अजूनही राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे संतापाचे वातावरण आहे. यादरम्यान नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी विष पिऊन आत्महत्या केली आहे. दाजीबा रामदास कदम (वय 23) असं तरुणाचं नाव आहे. आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी एकट्या नांदेडमधून 4 जणांनी आत्महत्या केली आहे.
काय घडले नेमके?
नांदेड शहराच्या छत्रपती चौक परिसरात झेंडा चौक येथे दाजीबा कदम याने शनिवारी दुपारी विष घेतले होते. तिथेच तो बेशुद्ध अवस्थेत पडला. ही माहिती त्याच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा रविवार 13 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. यामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दाजीबा कदम याचं बारावी पर्यंत शिक्षण झालं आहे. अनेक वेळा शासकीय नोकरीसाठी प्रयत्न केले, पण आरक्षण विना मला नोकरी मिळत नाहीये. एक मराठा लाख मराठा असं चिठ्ठीत लिहीत त्याने आत्महत्या केली.रामदास कदम यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. दिड एकर शेतीवर ते उपजीविका भागवत असतात. त्यांचा मुलगा दाजीबा हा बारावी उत्तीर्ण असून तो शासकीय नोकरीच्या शोधात होता. मात्र आरक्षणा विना त्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. दरम्यान दिवाळी सनाचा उत्साह असताना मुलाने आत्महत्या केल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.