नागपूर : नागपूर (Nagpur) जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील छावणी परिसरातील उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात (Accident) मायालेकरांना आपला जीव गमवावा लागला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
नागपूर जिल्हातील छावणी परीसरातील उड्डाणपुलावर यु टूर्न घेताना दुचाकीला कारने दिलेल्या धडकेत माय लेकराला आपला जीव गमवावा लागला. उड्डाणपुलावरून थेट खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. योगेश्री कृष्णानंद आत्राम (वय 30) आणि आलोक (वय 11, रा. भांडेवाडी) अशी या मृत मायलेकाची नावे आहेत. ही घटना गुरुवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास छावणीतील एसबीआय बँकेसमोरून जाणाऱ्या उड्डाणपुलावर घडली.
योगेश्री यांचे पती कृष्णानंद अवधूत आत्राम (Krishnananda Avadhuta Atram) खासगी कंपनीत नोकरी करतात. योगेश्री या गृहिणी होत्या. आलोकला एक भाऊ आहे. आलोक आणि त्याच्या भावाच्या शाळेला सुट्या लागल्याने ते दोघे योगेश्री यांच्या गिट्टीखदान येथील माहेरी गेले होते. या दरम्यान आलोक आजारी पडल्याने योगेश्री(Yogeshree Atram) आणि कृष्णानंद या दोघांना घरी घेऊन जाण्यासाठी आले. या नंतर ते आपल्या मुलांना घेऊन गिट्टीखदान येथून त्यांच्या घरी जात होते.
यावेळी छावणी येथील उड्डाणपुलावरून जात असताना आपण रस्ता चुकल्याचा संशय कृष्णानंद यांना आल्याने त्यांनी अचानक यू-टर्न घेतला. यावेळी उड्डाणपुलावरून जात असलेल्या कारने (एमएच 49 : बीएल 9957) त्यांना धडक दिली.ही धडक एवढी भीषण होती कि, योगेश्री आणि आलोक उड्डाणपुलावरून थेट खाली फेकले गेले आणि कृष्णानंद दुचाकीसह उड्डाणपुलावर पडले व गंभीर जखमी झाले. यावेळी योगेश्री आणि मुलगा आलोक (Alok Atram) उड्डाणपुलावरून खाली पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कृष्णानंद यांना उपचारासाठी जवळील मेयो रुग्णालयात (Mayo Hospital) दाखल करण्यात आले. योगेश्री आणि आलोक उड्डाणपुलावरून थेट खाली फेकले गेले. कृष्णानंद दुचाकीसह उड्डाणपुलावर पडले व गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे आत्राम कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल करून पुढील तपासाला सुरवात केली आहे.