Mumbai Crime News

Mumbai Crime News :काजलचे घराबाहेर सूत जुळलं अन् सासू-नवऱ्याचा केला गेम; पण…

1222 0

मुंबई : आजकाल पैसा हाती आला कि रक्ताची नातीदेखील एकमेकांच्या जीवावर (Mumbai Crime News) उठतात. याच पैशांपायी गडचिरोलीमध्ये एका सुनेनं नात्यातील एका महिलेची मदत घेऊन सासू सासऱ्यासह 5 जणांना जेवणातून विष देऊन ठार मारले होते. ही घटना ताजी असताना आता मुंबईमधूनदेखील अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये एका सुनेने आपला पती आणि सासूची हत्या केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
कमलकांत शाह असे मृताचे नाव असून त्यांचा कवितासोबत 2002 मध्ये विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. मृत कमलकांत शाह आणि आरोपी हितेश जैन यांची जुनी मैत्री होती. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या मैत्री झाली होती. यादरम्यान मृत कमलकांत यांची पत्नी कविता उर्फ काजल आणि हितेश जैन यांच्यात विवाहबाह्य प्रेमसंबंध तयार झाले होते. जवळपास 10 वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू होते. त्यानंतर कमलकांत यांची हत्या करण्याचा कट आखण्यात आला.

मृत कमलकांत शाह यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कमलकांत यांना पोटात दुखत असल्याची तक्रार होती. दरम्यान त्यांना उपचारावेळी मृत्यू झाला.यावेळी कमलकांत शाह यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीसांना संशय आला. विषबाधेतून त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

यानंतर शवविच्छेदन अहवालात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी कलम 302, 328, 120 (बी) नुसार, हत्येचा गुन्हा दाखल केला. यादरम्यान हितेश जैन आणि कविता यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. या दोघांमधील प्रेमसंबंध हे मागच्या 10 वर्षांपासून होते अशी माहिती समोर आली. आरोपी हितेश जैन आणि कविता यांना विवाह करायचा होता. त्यामुळे त्यांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या कमलकांतला दूर करण्याचा त्यांनी कट रचला. कमलकांतला मारल्यानंतर दोघेही विवाह करणार होते मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली असताना हितेश जैन आणि कविता यांनी आपला गुन्हा मान्य केला. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

Share This News

Related Post

ब्रेकिंग न्यूज ! ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी बातमी

Posted by - March 7, 2022 0
प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकार घेणार असून सर्वपक्षीय बैठकीत निर्णयावर एकमत देण्यात आले. आज ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ…

RAVI RANA : “बच्चू कडू दुखावले गेल्याने मी त्यांची माफी मागतो. पण त्यांचीही काही विधानं …!” VIDEO

Posted by - October 31, 2022 0
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात टोकाचा वाद सुरु होता. त्यावर आता पडदा पडला…
Jalna Crime

पित्याने विष पाजलेल्या ‘त्या’ चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

Posted by - May 17, 2023 0
जालना : जालना जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली होती. यामध्ये चारित्र्यावर संशय घेल्यामुळे पती- पत्नींमध्ये वाद…

राज ठाकरे जिंदाबाद होते आणि जिंदाबाद राहतील – वसंत मोरे

Posted by - April 9, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवर भोंग्यांसदर्भात वक्तव्य केलं.त्या नंतर आपण आपल्या प्रभागात भोंगे लावणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर…

तोच खरा वारसदार….; अभिनेता केदार शिंदेच ट्विट चर्चेत

Posted by - July 24, 2022 0
मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताहेत यामुळे सध्याचे राजकारण हा सगळीकडेच चर्चांचा विषय आहे. मराठी दिग्दर्शक केदार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *