मुंबई : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात एका 15 वर्षांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला तर एकाच कुटुंबातले पाच जण जखमी झाले आहेत. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास उर्से टोलनाक्याजवळ (Urse Toll Plaza) हा भीषण अपघात झाला.
यामध्ये एका भरधाव कारने आयशर टेम्पोला मागून धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि यामध्ये कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातग्रस्त कारमधून सहा जण प्रवास करत होते. या अपघातानंतर आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग पोलीस आणि राणी एम्ब्युलन्सने जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात जखमी झालेले सर्वजण एकाच कुटुंबातले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या अपघातात 15 वर्षीय सारा कुरेशी (Sarah Qureshi) हिचा मृत्यू झाला आहे.