अंधेरी : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अंधेरीत भीषण आग (Andheri Fire Incident) लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरीतील एका उच्चभ्रू इमारतीत आग लागली असून त्यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी आतापर्यंत 33 लोकांची इमारतीतून सुटका करण्यात आली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.
काय घडले नेमके?
मुंबईतील अंधेरी परिसरातील एका बहुमजली इमारतीत भीषण आग लागली आहे. आग लागल्याचं समजताच इमारतीतील नागरिकांनी जीवाच्या आकांताने बाहेर पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवानांच्या मदतीने 33 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे.
हि आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीत कुणालाही इजा झालेली नसली तरी इमारतीतील लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले आहे.आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर परिसराचं कूलिंग केलं जाणार असल्याचं अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आलं आहे.