मुरबाड : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. कधी कधी आपल्या चुकीमुळे किंवा कधी कधी समोरच्याच्या चुकीमुळे हे अपघात होत असतात. माळशेज घाटात (Malshej Ghat) असाच एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दुधाचा टॅंकर आणि मालवाहू टँकरमध्ये धडक झाल्याने हा अपघात झाला.
काय घडले नेमके?
कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाटातील भोरांडे गावाजवळ हा अपघात झाला. यावेळी कल्याणकडे जाणारा दुधाचा ट्रक आणि माळशेज घाटाकडे जाणारा भाजीपाल्याचा टेम्पो यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात दुधाचा टँकर रोडपासून खाली कोसळला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
माळेशज घाटात झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नींचा समावेश आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अक्षय दिघे आणि त्यांची पत्नी तेजस दिघे अशी या दोन मृतांची नावे आहेत. तसेच गाडीचा चालक वामन यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ulhasnagar Fire: उल्हासनगरमध्ये जे. के.ऑर्किड इमारतीला लागली भीषण आग
Maharashtra Politics : दानवेंची भेट नाकारल्याने मराठा आंदोलक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा
Hingoli Accident : दवाखान्यातून परतताना भीषण अपघात; 2 जणांचा जागीच मृत्यू
Loksabha Election : काँग्रेसला मोठा धक्का ! ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ नेत्याने घेतली माघार
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का !’या’ उमेदवाराचा अर्ज ठरला अवैध
Junnar News : बैलगाडा शर्यतीदरम्यान गेला तोल; मात्र पठ्ठयाने प्रसंगावधान राखत पूर्ण केली शर्यत
Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांद्यावरील निर्यातबंदी हटवली
Gangadhar Gade : ज्येष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन
Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा