कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. आज पहाटेच्या सुमारास कोल्हापुरमध्ये खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. ही बस गोव्याहून प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने येत होती. यादरम्यान ही बस शिराळा तालुक्यातील कोकरूड पुलावरून थेट वारणा नदीच्या पात्रात कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.
काय घडले नेमके?
अपघात घडलेल्या बसमध्ये 15 ते 20 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत होते. प्राथमिक माहितीनुसार,चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तुरकवाडी – आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूडच्या असणाऱ्या पुलावर हा अपघात घडला. पहाटे 6 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
सांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या शिराळा तालुक्यातील कोकरुड येथील वारणा नदीच्या पुलावरून खाजगी बस थेट नदी पात्राता पडल्याची घटना घडली आहे. मात्र यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच कोणीही जखमी झालेला नाही. बस चालकाने वेळीच बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
Gadchiroli News : घातपात कि अपघात ? बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा अचानक आढळला मृतदेह
Satara News : साताऱ्यात भीषण अपघात ! पोलिसांच्या गाडीने चौघांना उडवलं
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.