नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये (Jammu – Kashmir) भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने कंठस्थानी धाडले आहे. लष्कराने 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अखनूरमध्ये लष्कराची शोध मोहीम अजूनही सुरू आहे.भारतीय लष्कराला दहशतवाद्यांच्या लपण्याचा सुगावा लागला होता. त्यानंतर दहशतवाद्यांची शोध मोहीम तीव्र करण्यात आली.
दहशतवादी हल्ल्याच्या अवघ्या 38 तासांनंतर मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राजौरीमध्ये लष्कराने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरले होते. आता त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या ऑपरेशन दरम्यान, राजौरी आणि पुंछमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या कारवाईला 20 डिसेंबरच्या संध्याकाळपासून सुरुवात झाली होती. राजौरीतील थानामंडी परिसरात सुरू असलेली कारवाई आज चौथ्या दिवशीही सुरू आहे.
या भागात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान लष्कराच्या दोन वाहनांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यानंतर लष्कराचे चार जवान शहीद झाले. या कारवाईत लष्कराचे तीन जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Coronavirus : देशात कोरोनाचा धोखा वाढला ! देशभरात 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण
Health Tips : हिवाळ्यात दररोज दही खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य?
Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा
Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला
Belgaon News : दारुड्या शब्दावर बंदी आण्यासाठी मद्यपींनी काढला थेट विधान भवनावर मोर्चा
Pune Murder : पुणे हादरलं ! संशयातून मित्रानेच केली मित्राची हत्या