जळगाव : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. यामध्ये (Jalgaon Crime) भरधाव कारने चार ते पाच जणांना चिरडले आहे. ही अपघाताची घटना पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा या ठिकाणी घडली आहे. या अपघातात 16 वर्षांच्या विद्यार्थीनीसह 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
काय घडले नेमके?
गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पाचोऱ्याकडून भरधाव वेगात कार जळगावच्या दिशेने जात होती. तेव्हा गोराडखेडा गावाजवळ कारने चौघांना चिरडले. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी जात होते तर शेजमजूर घराकडे परतत होते.अपघातात दुर्वा पाटील, ऋतुजा भोईटे, सुभाष रामा पाटील, परशुराम पाटील यांना कारने चिरडले.हा अपघात एवढा भीषण होता कि, गाडीने चौघांना चिरडल्यानंतर गाडी पलटी झाली.
या अपघातात सुभाष पाटील आणि दुर्वा पाटील हे जागीच ठार झाले.तर अन्य दोघांना उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर जळगाव पोलिसांनी कारमधील तरुणांना ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या अपघातामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Akola Murder : अकोल्यात मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या; समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण
Kondhwa News : कोंढवा खुर्द येथील प्रसूतीगृह सुरू न केल्यास आपने दिला आंदोलनाचा इशारा
Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी काय अधिक फायदेशीर? ग्रीन टी की ब्लॅक टी?
Nanded Crime News : ट्रॅक्टर कालव्यात पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra News : महायुती’तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर होणार मेळावे
Pune Crime News : पुणे हळहळलं ! जन्मदात्या बापानेच मुलीला संपवलं
Savitribai Phule : विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी