जळगाव : जळगावमधील (Jalgaon News) अमळनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आठ- दहा दिवसांनी नळाला पाणी आल्याने घरातील पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या एका 11 वर्षीय मुलाला विजेचा झटका लागल्याने आपला जीव गमवावा लागला आहे.
काय घडले नेमके?
अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथील हर्शल योगेश पाटील (वय 11) हा अमळनेरमधील सानेगुरुजी शाळेत इयत्ता सहावीत शिक्षण घेत होता. त्याचे वडील योगेश पाटील शेती करतात. शिक्षणासाठी तो आई- वडील व भावासह गलवाडे रस्त्यावरील अमळनेरमधील साई गजानन नगरात वास्तव्यास होता. दरम्यान सोमवारी त्याचे आई- वडिल सबगव्हाण येथे शेतात गेले होते. तर मोठा भाऊ पेपर देण्यासाठी गेला होता.
घटनेच्या वेळी दुपारी एकला नळांना पाणी आल्याने हर्शल हा मोटार सुरू करण्यासाठी गेला. पिन जोडत असताना त्याचे हात ओले असल्याने त्याला विजेचा धक्का बसला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोठा भाऊ पेपर संपल्यावर घरी आला असता, त्याला हर्शल जिन्याखाली पडलेला आढळून आला. तोपर्यंत उशीर झाल्याने हर्शलचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sassoon Hospital : उंदीर चावल्यामुळे तरुणाचा मृत्यू; ससूनमधील धक्कादायक प्रकार
Gadchiroli News : गडचिरोलीत सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई; 8 माओवादी ठार
Shirpur Police : पावणेतीन लाखांची अवैध दारू जप्त; शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई
Loksabha Election: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; 40 दिग्गजांचा समावेश
Heena Gavit : चर्चेतील महिला : हीना गावित
Water Supply : गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा असणार बंद; महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे केले आवाहन
Sangli Accident : सांगलीमध्ये भीषण अपघात ! 4 ऊसतोड मजूरांचा जागीच मृत्यू
Chandrakant Patil : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात