हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli Triple Murder) एक हादरवून टाकणाऱ्या तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीसदेखील हादरले आहेत. आई-वडील आणि सख्ख्या भावाचा अपघात झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पोलीसदेखील हादरले आहेत.
नेमकं काय घडलं होतं?
9 जानेवारी रोजी आरोपीनं आपल्या भावाला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याच्यावर लोखंडी रॉडने वार केले आणि त्याची हत्या केली. त्याचा मृतदेह घरात संशय येऊ नये म्हणून रस्त्याजवळ असलेल्या नाल्याशेजारी नेऊन टाकला. रात्र उलटून गेली दुसऱ्या दिवशी दुपारी त्याने हाच पॅटर्न वापरून आईची तर रात्री वडिलांची हत्या केली.त्याने तिघांचे मृतदेह रस्त्याजवळच्या नाल्याशेजारी टाकले. त्यानंतर स्वत: हेल्मेट फोडलं आणि दुचाकीचाही अपघात झाल्याचा बनाव रचला. संशय येऊ नये म्हणून त्याने अपघात झाल्याचे प्लॅनिंग जबरदस्त केलं होतं मात्र चौकशीदरम्यान तो फसला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
या कारणामुळे केला खून?
आई-वडील आणि भाऊ पैसे देत नाही. नातेवाईक, मित्रांमध्ये बदनामी करतात याचा राग मनात असल्याने आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. महेंद्र कुंडलिक जाधव असे आरोपीचे नाव आहे. हिंगोली पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने ड्युटीवर हजर होण्याआधीच उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार
Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार
Ram Mandir Ayodhya : ‘त्या’ ऐतिहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात!
Mumbai Accident : मुंबईमध्ये भीषण अपघात; डंपरने दिलेल्या धडकेत 3 जणांचा मृत्यू