जळगाव : जळगावमधून (Jalgaon Crime) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. जळगाव शहरातून पाचोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर ग्रामस्थांनी संतप्त होऊन वाहनांची तोडफोड केली.
काय घडले नेमके?
शिरसोली येथील रहिवासी असलेल्या राणी सरदार चव्हाण या मुलगा सोहम (वय – 7 वर्षे) सोहमसह चार आणि 16 वर्षाचा भाचा असे चौघे इलेक्ट्रिक बाईकने (वाहन क्रमांक एमएच. 19.ईई. 8925) शिरसोलीकडे जात होते. रामदेववाडी गावाच्या पुढे घाट मार्गावर जळगावकडून येत असलेल्या कारने ( वाहन क्रमांक एमएच. 19.सीव्ही.6767) त्यांना जोरदार धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता कि या अपघातात दुचाकी चक्काचूर झाली असून चारचाकी रस्त्याच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेचा कंपाऊंड तोडून आत शिरली. यामध्ये दुचाकीवरील चौघे जागीच ठार झाले. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी वाहनांची तोडफोड करत घटनास्थळी दगडेफ़क केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Gunaratna Sadavarte : सदावर्ते दाम्पत्याला मोठा धक्का ! एसटी बँकेतील संचालकपद केले रद्द
Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रकला वाहनांची धडक बसल्याने भीषण अपघात