ठाणे : समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून हा महामार्ग (Samruddhi Mahamarg) मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसत आहेत. अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शहापूर तालुक्यातील कसारा विभागातील वाशळा गावाच्या परिसरात हा अपघात झाला आहे, या गावाच्या परिसरात समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं काम सुरू आहे.या मार्गाचं काम करणाऱ्या कामगारांना एका भरधाव डंपरने चिरडले आहे.
काय घडले नेमके?
शहापूर तालुक्यातील कसारा विभागातील वाशळा गावाच्या परिसरात समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं काम सुरू आहे. या महामार्गाचं काम करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कामगार याठिकाणी आले आहेत.रविवारी संध्याकाळी काम आटपून 25 ते 30 कामगार या महामार्गाच्या कडेला झोपले होते. परंतु रात्रीच्या सुमारास याच महामार्गाच्या कामासाठी लावण्यात आलेलं एक डंपर या कामगारांमध्ये घुसलं आणि हा अपघात झाला. या डंपरखाली तीन कामगार चिरडले गेले.
यामध्ये अशोक मोहिते (वय 50) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अंकुश मोहीते (वय 28) व सुमन पवार (वय 60) हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Porsche Car Accident : वेदांत अग्रवालचा पार्टीच्या अगोदरचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर
Pune Porshe Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; ‘ही’ व्यक्ती दाखल करणार तक्रार
Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर; मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी