पालघर : पालघरच्या अर्नाळ्यामधून (Palghar News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये अर्नाळा समुद्रात बोल उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या बोटीमध्ये एकूण 12 जण होते. त्यातील आकरा जण सुखरूप असून एकाचा मृत्यू झाला आहे. संतोष मुकने असे या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
काय घडले नेमके?
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विरारच्या अर्नाळा समुद्रात मोठी बोट दुर्घटना घडली आहे. अर्नाळा किल्ल्यातील घरांच्या दुरुस्तीसाठी खडी व विटा वाहून नेणारी बोट कलंडली आहे. या बोटीत एकूण 12 जण होते.बोटीतील 11 जण सुरक्षित असून एकाचा मृत्यू झाला आहे. संतोष मुकने असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पावसाळ्यापूर्वी किल्ल्यातील घरांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याने या बोटीतून विटा व वाळू नेली जात होती, मात्र या बोटीच्या पंख्यात नांगरलेल्या बोटीचा दोर अडकल्याने वेगात असताना ही बोट समुद्रातच उलटली. पाठीमागून येणाऱ्या एका बोटीमुळे 11 जण सुखरूप वाचले. मात्र या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Loksabha : लोकसभेच्या निकालानंतर महायुतीची ठरणार रणनिती; ‘या’ गोष्टीवरून होणार जागावाटप
Maharashtra Politics : ‘भुजबळांच्या वयाचा आदर करतो पण…’; ‘या’ भाजप नेत्याने दिला इशारा
Pune Crime News : पुणे हादरलं ! नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू