Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर हादरलं ! ‘त्या’ एका संशयामुळे काकाकडून पुतणीची हत्या

616 0

अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar News) काका आणि पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये रात्रीच्या सुमारास बाहेरील तरुणासोबत बोलत असल्याचा राग आल्याने काकाने आपल्या विवाहित पुतणीची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकी भागामध्ये घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी काकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन त्याला अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
बुधवारी रात्री त्यांची मुलगी सौ. नेहा संदीप कांबळे (वय 21, हल्ली रा.सप्तशृंगी मंदीराजवळ खडकी, कोपरगाव) ही काही कामासाठी घराबाहेर येऊन एका मुलासोबत बोलत असताना तीचे काका आरोपी संतोष हरीभाऊ आरणे (वय 26, रा.खडकी कोपरगाव) याने बाहेरील मुलासोबत बोलत असल्याच्या कारणावरुन आपल्या मृत पुतणीवर संशय घेतला. त्यानंतर तिला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कुऱ्हाडीने तिच्या दोन्ही पायांवर घाव घालून तिला जबर जखमी करुन तिची हत्या केली अशी फिर्याद मृत तरुणीच्या आईने दिली आहे.

मृत नेहा हिच्याशी तिचा काका संतोष याचे गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष आरणे विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 494/23 भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास डीवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख करत आहेत.

Share This News

Related Post

‘अजून सुतक संपले नाही तोवरच….’, जगदीश मुळीक यांच्या पोस्टरबाजीवर खरमरीत टीका

Posted by - April 1, 2023 0
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाला तीनच दिवस झाले अजून…
Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेमविवाह करणे तरुणीला पडले महागात; लग्नाच्या 6 महिन्यानंतर तरुणीची आत्महत्या

Posted by - December 6, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये प्रेमविवाह करणे तरुणीच्या अंगलट आले आहे. पुण्यातल्या आंबेगाव…
Uddhav Thackeray

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंना ‘ती’ चूक पडली महागात; नाहीतर आज झाले असते पुन्हा मुख्यमंत्री

Posted by - May 11, 2023 0
मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणारा राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने जाहीर केला आहे. हा निर्णय उद्धव ठाकरे…

थुंकल्यावर घाण अंगावर उडाली म्हणून जाब विचारणाऱ्या ज्येष्ठाची जबर मारहाण करून हत्या; डोंबिवलीतील खळबळजनक घटना

Posted by - December 12, 2022 0
डोंबिवली : डोंबिवलीतील चिचोंड्याचा पाडा या परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विजय पटवा वय वर्षे 52 हे डोंबिवली…

आमदार गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ‘ही’ मागणी

Posted by - June 2, 2022 0
सांगली – भाजपचे आमदार पडळकर यांनी अहमदनगरच्या नामांतरासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. अहमदनगरचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *