अहमदनगर : आज सगळीकडे मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी होताना दिसत आहे. मात्र यादरम्यान अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलींना जिंवत जाळलं. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव लांडगा या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.
लीलाबाई सुनील लांडगे, साक्षी आणि खुशी अशी मृतांची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणातील आरोपी सुनील गोरख लांडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Loksabha Election : अखेर ठाकरेंचं ठरलं ! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी होणार जाहीर
Ujjain Fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गर्भगृहाला भीषण आग
Ram Satpute : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! राम सातपुतेंना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर