अहमदनगर : अहमदनगरमधून एक भीषण अपघाताची (Ahmednagar Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये एसटी बस आणि इर्टिगा गाडीचा अपघात झाला आहे. ओव्हरटेक करत असताना हा भीषण अपघात झाला. एसटी बस आणि इर्टिगा यांच्यात हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव परिसरामध्ये हा भीषण अपघात झाला.
इर्टिगा गाडी आणि श्रीगोंदावरून शिरूरला जाणारी एसटी यांच्यात हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणांचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.दत्तात्रेय बळीराम खेतमाळीस, भाऊसाहेब बाबुराव मडके, हरी तुकाराम लडकत, विश्वनाथ लक्ष्मण नन्नवरे अशी या अपघातामध्ये मृत पावलेल्या लोकांची नावे आहेत.
या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत, त्यांना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. विठ्ठल गणपत डोके ,रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस,रोहिदास हरिभाऊ सांगळे अशी या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावं आहेत.हा अपघात एवढा भयंकर होता की यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.