अहमदनगर : राज्यात अपघाताचे (Accident News) प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अहमदनगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. पॅगो रिक्षा उलटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. नगर-कल्याण महामार्गावर कर्जुले हद्दीत पहाटे 5 वाजून 30 मिनिटांनी हा अपघात झाला.
या अपघातात जखमी झालेले बीड जिल्ह्यातील निरगुड गावचे रहिवाशी आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात पॅगो रिक्षाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Jalgaon News : जळगाव हादरलं ! पत्नी अन् 9 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या अन् पतीचीही आत्महत्या