रेवाडी : सध्या देशात अपघाताचे (Accident News) प्रमाण वाढतच चालले आहे. अशीच एक अपघाताची घटना हरियाणातील रेवाडी धरुहेरा मार्गावरील मसानी गावाजवळ घडली आहे. यामध्ये देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भक्तांवर काळाने घाला घातला आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
काय घडले नेमके?
हरियाणातील रेवाडी धरुहेरा मार्गावरील मसानी गावाजवळ असलेल्या बसस्थानकाजवळ हा अपघात झाला. यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, या सर्वांवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी 6 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून ते आज कुटुंबियांच्या ताब्यात दिले जाणार आहे. घटनेची माहिती मिळताच धारुहेरा पोलीस ठाण्याचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
खाटू श्यामजींचं दर्शन घेऊन सर्व भाविक घरी परत जात असताना हा अपघात झाला. गाझियाबादच्या अजनारा ग्रीन सोसायटीतील हे रहिवासी होते. महिलांनी दिल्लीतूनच इनोव्हा कार बुक केली होती. घरी परत जात असताना हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील मसानी गावाजवळ टायर बदलत असताना हा अपघात झाला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nagpur News : खळबळजनक ! नागपूरमध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Chandrapur News : धक्कादायक ! 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा