अंबरनाथ : अंबरनाथ (Ambernath Accident) येथील पालेगावाजवळून जाणाऱ्या कर्जत काटई महामार्गावर (Ambernath Accident) एका भरधाव ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या शिक्षिकेला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तरविन बिंद्रा (38) असे अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाला अटक केली आहे.
काय घडले नेमके ?
अंबरनाथ येथील पालेगाव परिसरातील कर्जत काटई मार्गावरून शुक्रवारी दुपारच्या सुमारास तरविन डोंबिवलीहून अंबरनाथच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून जात होत्या.यादरम्यान (Ambernath Accident) त्या पालेगाव चौकात आल्या असताना यावेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तरविन बिंद्रा या विद्यार्थ्यांच्या लाडक्या शिक्षिका होत्या. या घटनेची माहिती मिळताच सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघाताची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ट्रक आणि त्याचा चालक तानाजी आटपाडकर याला अटक केली. अशी माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.