जालना : जालना जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या एका 19 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. साक्षी अभिजीत तायडे (sakshi Abhijit Taide) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून साक्षीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. नवविवाहिते घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
महिनाभरापूर्वीच साक्षीचा विवाह अभिजीत तायडे (Abhijit Taide) या तरुणासोबत झाला होता. लग्न झाल्यापासून अभिजित साक्षीसोबत नीट बोलतच नव्हता. लग्न लागल्या पासूनच अभिजित हा वारंवार माझा विवाह माझ्या संमतीविना तुझ्याशी लावून दिला आहे. त्यामुळे तू मला अजिबात आवडत नाही, असं म्हणत साक्षीचा छळ करत होता. तसेच तिला घरच्यांनी हुंडा न दिल्यामुळे सतत टोमणे मारत होता. यानंतर आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती साक्षीने आपल्या माहेरच्या लोकांना दिली.
आज ना उद्या वातावरण निवळेल, साक्षीला त्रास कमी होईल, असे साक्षीच्या माहेरच्यांना वाटायचे त्यामुळे ते तिला समजावून सांगत होते. मात्र तरीदेखील पती अभिजितकडून होणारा त्रास वाढत चालल्याने अखेर साक्षीने काल मंगळवारी रात्री टोकाचा निर्णय घेत राहत्या घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide) केला.