Mumbai Pune Express Way

Mumbai Pune Express Way: ‘या’कारणामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे झाली ठप्प!

654 0

मुंबई : पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Express Way) खंडाळा घाटातील खंडाळा बोगद्याच्या आतमध्ये तिन्ही लेनवर एक अवजड कंटेनर पलटी झाल्यामुळे मुंबईकडे जाणारी (Mumbai Pune Express Way) वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी पलटी झालेला कंटेनर जोपर्यंत बाजूला केला जात नाही. तोपर्यंत हलक्या वाहनांनी जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे जावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच महामार्ग पोलिसांनी मुंबईकडे जाणारी वाहतूक (Mumbai Pune Express Way) लोणावळ्यातील वलवण येथून जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वळवली आहे. हा अपघात आज सकाळी 11 च्या दरम्यान घडला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्ग व लोणावळा शहर पोलिस, देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तो अपघातग्रस्त कंटेनर बाजूला काढण्याचे काम सुरु करण्यात आले होते.

Share This News

Related Post

‘मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही कुणावर प्रेम केलं होतं का हो ? शेतकऱ्याच्या मुलाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Posted by - April 8, 2022 0
हिंगोली- शेतकरी होऊन प्रेम करणं खरंच चुकीचं असतं का? असा सवाल एका प्रेम करणाऱ्या युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र…
Manohar Joshi

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल

Posted by - May 23, 2023 0
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले…

#Travel Diary : भारतातील ‘सातपुडा राष्ट्रीय उद्यान’ म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गचं ! वाचा कुठे आहे ? कसे पोहोचायचे आणि संपूर्ण माहिती PHOTO

Posted by - February 22, 2023 0
#Travel Diary : जंगल सफारी सध्या ट्रेंडमध्ये आहे. जंगल सफारीसाठी देशात असलेल्या राष्ट्रीय उद्यानात मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. काही…

मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या मोर्च्यायापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Posted by - December 17, 2022 0
मुंबई: महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईमध्ये महामोर्चा काढण्यात येत असून या महामोर्चाच्या आधी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री…

जमिनीच्या तुकड्यासाठी चुलत भाऊ झाला वैरी, बारामती येथील थरारक घटना

Posted by - April 13, 2023 0
वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून सख्या चुलत भावाचा शेतातच दगडाने ठेचून खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील सांगवी या गावात घडली. खून करुन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *