मुंबई : पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शाळांची घंटा आता सकाळी 7 ऐवजी 9 वाजता वाजणार आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याबाबतचे शासन परिपत्रक काढण्यात आलं आहे.
![](https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2023/04/School.jpg)