पुणे : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासह डझनभर आमदारांनी बंडखोरी केली. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली आणि पक्षाची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेतेपदी आणि मुख्य प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले.
![Jitendra Awhad](https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2023/07/Jitendra-Awhad.jpg)