पुण्यातील गहुंजे स्टेडियम वर पार पडलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात भारताने सात गडी राखत बांगलादेशवर दणदणीत विजय संपादन केलाय.
तब्बल 27 वर्षानंतर पुण्यात विश्वचषकाचा सामना पार पडला होता या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. या सामन्यात बांगलादेश ने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला होता.
विराट कोहलीच्या शतकी खेळीने भारताचा विजय सहज व सुखर झाला. एकदिवसीय सामन्यातील विराटचं 48 वं शतक होतं