नवी दिल्ली : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अन्नातून विषबाधा झाल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निर्मला सीतारामन यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यांना आज दुपारी 12 च्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
![](https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2022/12/WhatsApp-Image-2022-12-26-at-2.59.58-PM.jpeg)