PM Narendra Modi : "2047 पर्यंत भारत विकसित करणारच"! लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा निर्धार, स्वातंत्र्य दिनाला देशभर उत्साह - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली: देशभरात आज 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 13 व्या वेळी देशाला संबोधित केले. यंदा भारताचे राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ला 150 वर्षे पूर्ण झाल्यामुळे या दिनाला विशेष महत्त्व होते. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, तीनही सैन्यदलांचे प्रमुख, परदेशी राजदूत, पद्म पुरस्कार विजेते आणि हजारो नागरिक उपस्थित होते. तिरंगी फुगे, हवाई दलाची फ्लायपास्ट आणि एनसीसी विद्यार्थ्यांची संचलन ही प्रमुख आकर्षणे होती.

लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की देश सध्या पूर आणि भूस्खलनाच्या संकटातून जात आहे. पीडित कुटुंबांसोबत संपूर्ण देश उभा आहे असा विश्वास त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले की कोणताही देश महान होण्यासाठी मोठी स्वप्ने आणि दृढ संकल्प लागतात. 2047 मध्ये स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला भारत विकसित राष्ट्र म्हणून उभा राहील हाच आपला संकल्प आहे. "मी वाऱ्यावर बोलत नाही" असे सांगत मागील 12 वर्षांतील सरकारच्या कामगिरीचा आढावा त्यांनी दिला. या काळात 12 वर्षांत भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला. गरीबीतून कोट्यवधी लोक बाहेर आले. संरक्षण उत्पादन 4 पट, खादी आणि ग्रामोद्योग 5 पट, इलेक्ट्रॉनिक उत्पादन 7 पट, आधुनिक रेल्वे कोचचे काम 21 पट आणि मोबाइल उत्पादन 31 पट वाढले. डिजिटल क्षेत्रातही मोठी झेप घेत इंटरनेट वापरकर्ते 4 पट, पेटंट ग्रँट 4 पट आणि डिजिटल ट्रान्झेक्शन 100 पट वाढल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी 140 कोटी जनतेच्या संकल्पाला आता कोणीही रोखू शकत नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.