‎Akola farmers news : अकोल्यात संतप्त शेतकरी आता विम्याचे पैसे सरकारलाच परत करणार! ‎नेमकं प्रकरण काय? - टॉप न्यूज मराठी

पीक विम्याची तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्यांची थट्टा उडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसोबत हा संतापजनक प्रकार घडलाय. पीक विम्याच्या हप्त्यापेक्षाही शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असताना, मदत मिळण्याऐवजी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. काय आहे. दरवर्षी मोठ्या आशेने पिकांचा विमा उतरवतात. शेकडो रुपये हप्ता भरून संकटाच्या वेळी मदत मिळेल ही त्यांची अपेक्षा असते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता 'भीक नको, पण कुत्रं आवर' अशी म्हणण्याची वेळ राज्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. विमा कंपन्यांनी हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर नाममात्र रक्कम जमा केली आहे.​मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये तर शेतकऱ्यांना विमा हप्त्यापेक्षाही कमी नुकसान भरपाई मिळाली आहे. ही कसली नुकसान भरपाई? असा सवाल करत, मिळालेली ही तुटपुंजी रक्कम आता शेतकरी सरकारलाच परत करणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.