सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत असून देवदर्शन आटोपून घरी निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातलाय रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पिकप कोसळून तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविक आले असताना येथील विहिरीत त्यांचे पिकअप वाहन पडले. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत पिकअप गाडी पडल्याने ही दुर्घटना घडली. त्यानंतर, स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मात्र, वाहनातील भाविकांची मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळावर परिस्थिती भीषण असून पिकअपमधील सर्वच भाविक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचलं आहे. अग्निशामक दलाची यंत्रणा बोलावली आहे. प्रांताधिकारी, जिल्हा प्रशासनाची टीम रवाना झाली आहे. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
अपघातील मृत हे पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावाचे असल्याचे सांगण्यात येत आहेत. यामध्ये सुरवसे आडनावाच्या व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती आहे. चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय...