क्रीडा : विराट कोहली निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेटचे भविष्य काय ? भारतीय क्रीडा विश्वाचे 4 नवे कर्तबगार खेळाडू ! - टॉप न्यूज मराठी

क्रीडा : सध्याचे भारतीय क्रिकेट म्हटलं की एकच नाव डोळ्यासमोर येतं विराट कोहली. पण काळ कोणासाठीच थांबत नाही. २०२४ मध्ये T20 वर्ल्ड कप जिंकल्यावर विराटने T20 मधून निवृत्ती घेतली आणि २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटला देखील अलविदा केले. आता तो फक्त वनडे खेळतोय. त्यामुळे प्रश्न येतो की, किंग कोहली नंतर भारतीय क्रिकेटचे काय होणार?

विराट कोहली - 3 वर्षाच्या मुलापासून किंग कोहलीपर्यंतचा प्रवास

विराटचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीतील उत्तम नगर येथे एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात झाला. वडील प्रेम कोहली वकील होते आणि आई सरोज गृहिणी. विराटने वयाच्या ३ ऱ्या वर्षीच बॅट हातात घेतली होती.

वयाच्या ९ व्या वर्षी त्याने वडिलांकडे हट्ट धरून पश्चिम दिल्ली क्रिकेट अकॅडमीत प्रवेश घेतला, जिथे राजकुमार शर्मा त्याचे पहिले कोच होते. २००६ मध्ये वडिलांचे निधन झाले तेव्हा दुसऱ्याच दिवशी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीसाठी ९० धावांची खेळी केली - तिथेच त्याचा जिद्दी स्वभाव दिसला.

२००८ मध्ये त्याने अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताला चॅम्पियन बनवले आणि १८ ऑगस्ट २००८ रोजी श्रीलंकेविरुद्ध त्याचे वनडे पदार्पण झाले. त्यानंतर १२३ टेस्ट, २९५+ वनडे आणि १४,०००+ वनडे रन्स, ८० शतकं - हा इतिहास आहे.

कोहली नंतर कोण ?  भारतीय क्रिकेटचे 4 नवे नाव 

चांगली गोष्ट म्हणजे भारताने कोहलीची उणीव भरून काढण्यासाठी आधीच तयारी केली आहे.

१. शुभमन गिल: यालाच पुढचा विराट म्हटले जाते. सध्याचा टेस्ट आणि वनडे कर्णधार. क्लासिकल फलंदाजी आणि प्रचंड फिटनेस.

२. यशस्वी जैस्वाल: झोपडपट्टीतून भारतीय संघात आलेला हा डावखुरा ओपनर. भूक आणि आक्रमकता अगदी कोहलीसारखीच.

३. ऋतुराज गायकवाड / साई सुदर्शन: पुण्या-मुंबईचा ऋतुराज हा टेक्निकली खूप साऊंड आहे, तर साई सुदर्शन हा नव्या पिढीचा मिस्टर 360 डिग्री.

४. जसप्रीत बुमराह: फलंदाजीत गिल असेल तर गोलंदाजीत बुमराह हा कर्णधार आणि लीडर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय पेस अटॅक जगात नंबर १ आहे.

विराट कोहली हा एक खेळाडू नाही तर एक कल्चर होता - फिटनेस, आक्रमकता आणि जिंकण्याची भूक. तो निवृत्त झाला तरी त्याने लावलेले फिटनेसचे रोपटे आजच्या तरुण पिढीत दिसते. भारतीय क्रिकेटचा भविष्यकाळ सुरक्षित हातात आहे. आता एका किंगवर अवलंबून न राहता, टीम इंडिया ५-६ स्टार्सवर चालणारा संघ बनली आहे. कोहलीने पाया घातला आहे, इमारत आता नवे खेळाडू पूर्ण करतील.