नारळ पाण्याला निसर्गाचे एनर्जी ड्रिंक म्हटले जाते. बाजारातील कोल्ड्रिंक्सपेक्षा हे 100 पटीने चांगले आहे, कारण यात साखर नाही, केमिकल नाही, फक्त नैसर्गिक जीवनसत्त्वे आहेत.
1. सकाळी रिकाम्या पोटी (सर्वात उत्तम वेळ) - सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते, पोट साफ होते आणि दिवसभर फ्रेश वाटते.
2. व्यायामानंतर - जिम किंवा खेळानंतर घामाने शरीरातील क्षार कमी होतात. नारळ पाणी हे क्षार लगेच भरून काढते.
3. दुपारी 11 ते 2 च्या दरम्यान - उन्हामुळे थकवा, डोकेदुखी होत असेल तर या वेळेत प्यावे.
कधी पिऊ नये? रात्री झोपण्यापूर्वी आणि जेवणाच्या लगेच आधी किंवा नंतर पिऊ नये. रात्री प्यायल्याने सर्दी होऊ शकते आणि वारंवार लघवीला जावे लागते.
दिवसातून किती नारळ पाणी प्यावे?
निरोगी व्यक्तीने दिवसातून एक किंवा दोनच नारळ पाणी प्यावे. 200 ते 300 ml पुरेसे आहे. जास्त प्यायल्याने पोटॅशियम वाढून त्रास होऊ शकतो. ज्यांना किडनीचा आजार आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
1. उष्णता कमी करते: शरीरातील उष्णता, जळजळ आणि लघवीची जळजळ कमी होते.
2. वजन कमी करण्यास मदत: यात कॅलरी खूप कमी आहेत आणि भूक नियंत्रणात राहते.
3. पचन सुधारते: बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी असलेल्यांसाठी हे वरदान आहे.
4. त्वचा उजळते: रोज प्यायल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते, पिंपल्स कमी होतात.
5. हृदयासाठी चांगले: यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
6. रोगप्रतिकारशक्ती वाढते: यातील अँटिऑक्सिडंट्स सर्दी-खोकल्यापासून वाचवतात.
7. केसांसाठी फायदेशीर: केस गळणे कमी होते.
रोज एक ताजे, गोड नारळ पाणी प्या, पण पॅकेटमधले टेट्रा पॅकचे नारळ पाणी टाळा. ताजे नारळ पाणी हेच खरे अमृत आहे.