हिंदू घरात उंबरठ्यावर असलेली तुळस म्हणजे फक्त एक रोप नाही, तर ती आरोग्य, शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. आषाढीपासून कार्तिकीपर्यंत तुळशीला विशेष महत्त्व आहे. या आषाढीत तुळस लावा आणि घराला शुद्ध, पवित्र आणि निरोगी बनवा
शास्त्रानुसार घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुळस लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. तुळस 24 तास ऑक्सिजन देते आणि हवेतील जंतू नष्ट करते.
धार्मिकदृष्ट्या तुळस ही श्रीकृष्ण आणि विष्णू यांना प्रिय आहे. रोज तुळशीला पाणी घालून दिवा लावल्याने घरात सुख-शांती नांदते आणि आर्थिक अडचणी दूर होतात असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला तुळस ठेवणे सर्वात शुभ आहे.
तुळस सुकते म्हणून काळजी वाटते का? हे 3 नियम पाळा:
1. माती आणि कुंडी: पाण्याचा निचरा होणारी माती वापरा. 50% माती + 30% शेणखत + 20% वाळू हे मिश्रण उत्तम. कुंडीला खाली छिद्र असावे.
2. पाणी आणि ऊन : उन्हाळ्यात रोज सकाळी थोडे पाणी द्या. हिवाळ्यात 2 दिवसातून एकदा. पण पाणी साचू देऊ नका. तुळशीला रोज 4-5 तास कोवळे ऊन मिळणे गरजेचे आहे.
3. मंजिरी तोडणे : तुळशीला बी आले की लगेच मंजिरी खुडून टाका. नाहीतर रोप लवकर म्हातारे होते. महिन्यातून एकदा चहाचा चोथा किंवा कांद्याच्या पाण्याचे खत द्या.
4. रविवारची सुट्टी : रविवारी, एकादशीला आणि सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत असे शास्त्र सांगते.
5. तुळशीसोबत बोलणे : हो, तुळशी रोज 2 मिनिटे बोला. प्रेमाने वाढवलेल्या रोपाला रोग कमी लागतो.
1. सर्दी-खोकल्यासाठी: 4-5 तुळशीची पाने + आल्याचा तुकडा + मध घालून काढा प्यायल्याने कफ कमी होतो.
2. रोगप्रतिकारक शक्ती: रोज सकाळी 2-3 तुळशीची पाने चावून खाल्ल्याने शरीराची इम्युनिटी वाढते.
3. तणाव आणि पचन: तुळशीचा चहा तणाव कमी करतो. जेवणानंतर 2 पाने खाल्ल्याने पचन सुधारते.