Farmer News

Crop Insurance : शेतकऱ्यांना आता पिकाचादेखील काढता येणार इन्शुरन्स

196 0

मुंबई : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात शेती करणाऱ्यांची संख्या (Crop Insurance) मोठी आहे. वादळ, महापूर, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अनेकवेळा नुकसान सहन करावे लागते. बऱ्याचदा त्यांना दुष्काळादेखील सामना करावा लागतो. हे नुकसान कमी व्हावं, यासाठी केंद्र सरकारने पीएम फसल बिमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी पिकाचा विमा उतरवू शकतात. असं केल्यास कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या पिकांचं नुकसान झाल्यास सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना त्या नुकसानाची भरपाई होण्यास मदत मिळते. आता ही योजना नेमकी काय आहे? त्यासाठी कसा अर्ज करायचा? यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया….

प्रधानमंत्री फसल बिमा योजना नेमकी काय आहे?
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम फसल बिमा योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना पिकावर विमा संरक्षण दिलं जातं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना विम्याच्या हप्त्याच्या 50 टक्के रक्कम भरावी लागते. उर्वरित 50 टक्के रक्कम केंद्र आणि राज्य सरकार अनुदान म्हणून देतात. या योजनेत रब्बी पिकांवर विमा संरक्षणाचा प्रीमियम 1.5 टक्के आहे. यातला शेतकऱ्याला फक्त 0.75 टक्के विमा प्रीमियम भरावा लागतो. उर्वरित रक्कम सरकार सबसिडी म्हणून देते. पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या विम्यामुळे आर्थिक मदत मिळते.

या योजनेसाठी कसा कराल अर्ज?
तुम्हाला तुमच्या जिल्हा बँकेत किंवा कृषी कार्यालयात जावं लागेल.
तिथे तुम्हाला प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचा अर्ज भरावा लागेल.
फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं पीक, शेत, विम्याची रक्कम इत्यादी माहिती द्यावी लागेल.
यानंतर शेतकऱ्यांना फॉर्मसह सर्व कागदपत्रांच्या फोटो कॉपीज जमा कराव्या लागतील.
जेव्हा कृषी कार्यालय किंवा बँकेकडून अर्ज स्वीकारला जाईल, तेव्हा शेतकऱ्याला विम्याचा प्रीमियम भरावा लागेल.
विम्याचा हप्ता भरल्यानंतर शेतकऱ्याला पीक विमा पॉलिसी मिळेल.

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ?
अ‍ॅप्लीकेशन लेटर
पेरणी प्रमाणपत्र
शेतीच्या जमिनीचा नकाशा
आधार कार्ड
बँक पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Gondia News : आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू

RBI MPC Meet : RBI चं पतधोरण जाहीर

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का ! बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

Share This News

Related Post

Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : भव्य शक्तिप्रदर्शनात मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज दाखल

Posted by - April 25, 2024 0
पुणे : कोथरुड येथील छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे स्मारक ते डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे स्मारक अशी…
pune police

पुणे शहरातील 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Posted by - January 20, 2023 0
पुणे पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तीन सहायक…

राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर ; राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची माहिती

Posted by - September 6, 2022 0
पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम…
Maharashtra Rain

Maharashtra Rain : पुढील 48 तासांत ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Posted by - September 30, 2023 0
मुंबई : सप्टेंबर महिन्याची सुरुवात मुसळधार पावसानं (Maharashtra Rain) झाली. गणेशोत्सवामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. पावसाच्या आगमनाने आपला शेतकरीदेखील…
Ravikant Tupkar

Onion Export Tax : कांद्यावरील 40 % निर्यात शुल्क मागे घ्या,अन्यथा केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या दिल्लीतील घरात कांदा फेकणार : रविकांत तुपकरांचा इशारा

Posted by - August 22, 2023 0
बुलढाणा : केंद्र सरकारने कांद्यावर 40 % निर्यात कर (Onion Export Tax) लादून आणखी एक शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *