धाराशिव : उस्मानाबादचं नामकरण धाराशिव तर औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यास राज्य सरकारनं (High Court) परवानगी दिली होती. दरम्यान उस्मानाबादचं नामकरण धाराशिव झाल्यानंतर नामांतरण विरोधी कृती समितीच्या वतीनं याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून धाराशिवच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात नामांतरणाबाबतच्या या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने निर्णय देत धाराशिवच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व अरिफ डॉक्टर या दोन न्यायमुर्तीच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Palghar Crime : धक्कादायक ! 3 महिलांनी केली पोलिसांना बेदम मारहाण
Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरवस्तीत केली फायरिंग
Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू
Gunaratna Sadavarte : सदावर्ते दाम्पत्याला मोठा धक्का ! एसटी बँकेतील संचालकपद केले रद्द
Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रकला वाहनांची धडक बसल्याने भीषण अपघात