नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील अनेक बँका आणि पतसंस्थांच्या व्यवहारांसह अनेक आर्थिक व्यवहार आणि उलाढालींवर आरबीआय (RBI) अर्थात भारतीय रिझर्व्ह बँक लक्ष ठेवून असते. कुठंही गैरव्यवहार किंवा तत्सम प्रकार आढळल्यास किंवा एखाद्या संस्थेकडून आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली झाल्यास RBI कडून कठोर कारवाई करण्यात येते. सध्या अशीच कारवाई देशातील दोन मोठ्या बँकांवर करण्यात आली आहे.
कोणत्या बँकांवर करण्यात आली कारवाई?
आरबीआयकडून बँक ऑफ इंडिया आणि बंधन बँक या दोन्ही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही नियमांचं पालन न केल्यामुळं बँकांवर ही कारवाई करत दंड ठोठावण्यात आल्याचे RBI कडून स्पष्ट करण्यात आले आहे. आरबीआयनं बँक ऑफ इंडियाला 1.4 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर, बंधन बँकेला 29.55 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
का करण्यात आली कारवाई?
ठेवीवरील व्याजदर, बँकेतील ग्राहक सेवा, कर्जावर व्याजदर यासह क्रेडिट सूचना कंपनी नियम 2006 मधील तरतुदींचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने एसबीआय, कॅनरा बँक, सिटी युनियन बँकवर कारवाई केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.