यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात पुसद दिग्रस मार्गावर एक भीषण अपघात (Accident News) झाला आहे. बेलगव्हान घाटामध्ये हा अपघात झाला असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 11 जण जखमी झाले आहेत. पोहरादेवी इथं नवस फेडायला जाणाऱ्यांचा आपे मालवाहू वाहनाचा अपघात झाला. या अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी मेडिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कसा घडला अपघात?
पुसद तालुक्यातले काही जण पोहरादेवीला निघाले होते. नवस फेडण्यासाठी ते जात होते. तेव्हा लोकनायक बापूजी अणे स्मृतीस्थळाजवळ बेलगव्हान घाटात गाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की जागीच 5 जणांचा मृत्यू झाला. अपघातात 11 जण जखमी झाले असून त्यांच्यावर मेडिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. मृत्यू झालेले आणि जखमी हे पुसद तालुक्यातल्या मोहा तांडा, टोकी तांडा, पांढुरणा सिंघनवाडी या ठिकाणचे रहिवासी आहेत. अपघातानंतर स्थानिक लोकप्रतिनीधींनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Gautami Patil : गौतमीने क्रिकेटचं मैदान गाजवलं ! ‘त्या’ हुक स्टेपनी घेतली चाहत्यांची विकेट
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने ड्युटीवर हजर होण्याआधीच उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार
Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार
Ram Mandir Ayodhya : ‘त्या’ ऐतिहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात!
Mumbai Accident : मुंबईमध्ये भीषण अपघात; डंपरने दिलेल्या धडकेत 3 जणांचा मृत्यू