Chandrapur News

Chandrapur News : खळबळजनक ! घात कि अपघात ? दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या तरुणाचा अचानक आढळला मृतदेह

511 0

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर शहरात अनेक प्राचीन वास्तू आहेत. या वास्तू बघायला दूरवरून पर्यटक येतात.मात्र, अशाच एका प्राचीन विहरीत मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शहरातील सोनामाता मंदिराजवळ असलेल्या जुन्या काळातील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. तोल गेल्याने हा अपघात झाल्याचे समजत आहे. आकाश पाल (26) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो माता चौक येथील रहिवासी आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
माता चौक येथे राहणारा आकाश पाल हा दोन दिवसापासून बेपत्ता होता. कुटुंबियांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला पण त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळं कुटुंबियांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती. यादरम्यान आज कुटुंबियांना एका व्यक्तीने सांगितलं, एक तरुण सोमनाथ मंदिराजवळ असलेल्या प्राचीन विहिरीजवळ त्यांना दिसला होता.

कुटुंबियांना शंका आली. कुटुंबियांनी विहिरीकडे धाव घेतली. तेव्हा त्यांना मृतदेह तरंगताना दिसला.पोलीस तथा महानगर पालिका आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. कुटुंबातील कर्ता तरुण गेल्याने आकाशच्या कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Viral Video

Viral Video : शेळ्या चोरल्याच्या संशयावरून दलित व्यक्तीला उलटं टांगून मारहाण

Posted by - September 3, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावामध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना (Viral Video) घडली होती. यामध्ये शेळ्या…
Divya Pahuja

Divya Pahuja : मॉडेल दिव्या पाहुजाचा 11 दिवसांनंतर सापडला मृतदेह; ‘त्या’ एका पुराव्याने उलगडलं हत्येचं गूढ

Posted by - January 13, 2024 0
गुरुग्रमा : वृत्तसंस्था – मॉडेल दिव्या पाहुजा (Divya Pahuja) हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 10 दिवसांपासून दिव्या…

‘हनुमान चालीसा म्हणाल तर याद राखा !’ नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

Posted by - May 25, 2022 0
नवी दिल्ली- हनुमान चालीसा विषयावरून गेल्या काही दिवसांपासून राणा दांपत्य चर्चेत आले आहे. आता नवनीत राणा यांच्या संदर्भात धक्कादायक माहिती…

भाजपा 27% ओबीसी उमेदवारांना संधी देणार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा (व्हिडिओ)

Posted by - May 7, 2022 0
मुंबई- राज्यातील ओबीसीचं राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या हलगर्जीपणामुळे गेलं असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपा 27% ओबीसी उमेदवारांना…

पराभवाच्या रागातून चक्क ढाबा पेटवून दिला! सांगली जिल्ह्यातील घटना

Posted by - March 9, 2022 0
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी येथील श्रीधर कोळी यांनी नव्यानेच ढाबा बांधला होता. सोमवारी 7 मार्च रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *