नाशिक शहरातून एक मोठी बातमी समोर आली असून कांदा लिलाव बंदचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे उद्यापासूनच कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू होणार असून प्रशासनासोबत झालेल्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या १२ दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद असल्यामुळे तब्बल ३०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले होते.
विविध मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंद पुकारण्यात आला होता.